शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात हमीभावासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:07 IST

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह ...

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिला.वाळवा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर आला. तेथे जाहीर सभा झाली. सभेनंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तहसीलदार नागेश पाटील यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.संग्रामसिंह पाटील म्हणाले, मुबलक पाणी असतानाही विजेचे लोडशेडिंग सुरु आहे. विजेबरोबरच तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेली ३ वर्षे १५ डिसेंबरपूर्वी खड्डे मुजवणार असल्याची घोषणा करतात. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवून घेणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शासनात बसून भूलथापा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सामान्य जनतेला कंगाल केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधात असताना टाळ वाजवून शेतकºयांसाठी आंदोलन करत राज्यभर फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना शेतकºयांचा विसर पडला आहे.माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी लाभार्थी’ जाहिरातीतून शासनाची लबाडबाजी सुरु आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या; मात्र त्याची जाहिरातबाजी केली नाही. शेतकºयांच्य कर्जमाफीला ४ महिने झाले. दिवाळी गेली तरी अजून १ पैसाही जमा झालेला नाही.आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिव हुलवान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कार्तिक पाटील, क्रांतिप्रसाद पाटील, उदय शिंदे, गुरुराज माने, विशाल पवार, उमेश पवार, अमोल गुरव, विशाल सूर्यवंशी, मनोज पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप