शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात हमीभावासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:07 IST

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह ...

इस्लामपूर : शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने इस्लामपूर तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, यावेळी सोयाबीनसह इतर शेतमालाला हमीभाव न मिळाल्यास युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते शासनाचा निषेध म्हणून जाळपोळ करतील, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांनी दिला.वाळवा तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन हा मोर्चा प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयासमोर आला. तेथे जाहीर सभा झाली. सभेनंतर तहसील कार्यालयाच्या आवारात सोयाबीन ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. तहसीलदार नागेश पाटील यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.संग्रामसिंह पाटील म्हणाले, मुबलक पाणी असतानाही विजेचे लोडशेडिंग सुरु आहे. विजेबरोबरच तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्नही गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील गेली ३ वर्षे १५ डिसेंबरपूर्वी खड्डे मुजवणार असल्याची घोषणा करतात. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवून घेणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शासनात बसून भूलथापा मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख म्हणाले, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सामान्य जनतेला कंगाल केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस विरोधात असताना टाळ वाजवून शेतकºयांसाठी आंदोलन करत राज्यभर फिरत होते. आता सत्तेत आल्यावर त्यांना शेतकºयांचा विसर पडला आहे.माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी लाभार्थी’ जाहिरातीतून शासनाची लबाडबाजी सुरु आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने अनेक योजना राबविल्या; मात्र त्याची जाहिरातबाजी केली नाही. शेतकºयांच्य कर्जमाफीला ४ महिने झाले. दिवाळी गेली तरी अजून १ पैसाही जमा झालेला नाही.आष्टा शहराध्यक्ष अनिल पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिव हुलवान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, कार्तिक पाटील, क्रांतिप्रसाद पाटील, उदय शिंदे, गुरुराज माने, विशाल पवार, उमेश पवार, अमोल गुरव, विशाल सूर्यवंशी, मनोज पाटील, आबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप